Unknown Alkie
- 89 followers
- Category: Motivational
- | Follow
BBIU-030 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०३० BBIU030
Published: 1 year agoCategory:
- Motivational
About:
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?
मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-030 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - तीसावा वेळ - 46.43 मिनिटे ???
सेट असाईड प्रेयर पान क्र 22 आणि 23 याला उपाय आहे वाचन क्रमशः पहिली पायरी हतबलता आजाराचा फसवा भाग पहिल्या प्याल्याला नकार देण्याचा विचारही करता येत नाही पहिल्या घोटात धोका दिसत नाही आम्हाला कोणीच वाचवू शकत नाही याला उपाय आहे एकच उपाय आहे आणि तो आध्यात्मिक उपाय आहे आध्यात्मिक उपकरणे आश्वासने, Musts आणि अनुवादातील सुधारणा ???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी ऐकावा. ?????
Please Login to comment on this video
Anju Phadke . 1 year ago
म स बी बु -030 ची प्रतिक्रिया.... ?पहिला घोट घ्यायची इच्छा झाली की आम्हाला चॉईस उरत नाही.?जळत्या निखाऱ्यावर हात ठेवल्यास भाजेल ह्या जाणीवेचा अभाव हाच आमच्या असाह्यतेचा द्योतक बनलेला असतो.?पहिला घोट घेताना आम्हांला दारूची भीती वाटत नाही, आणि तो घोट घेतल्यास मागचे राडे, धांगडधिंगा, विटंबना काहीच आठवत नाही.?एकदा दारु पिण्याचा विचार मनात आला, की दारु घेण्याचा कोणताच धोका वाटत नाही, त्याला बचाव करण्याचा कोणताही आधारच रहात नाही.हा आजाराचा फसवा भाग आहे.?पहिला घोट घ्यायच्या आधीही आम्ही हतबल आहोत आणि एकदा प्यायला सुरवात केल्यावर ती थांबवतानाही आम्ही हतबल असतो. हाच आजाराचा दुसरा फसवा भाग आहे.?एकदा पिण्यास सुरुवात केली की 2/3 पेग झाल्यावर आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो की अरे ही सुरुवातच कशी झाली? दारु पिण्याने काय होते हे माहित असतानाही मी कसा आणि का प्यायलो??हे विचार करत असतानाच लगेंच असेही मनात येते की ठीक आहे, आता विचार करण्यात काय अर्थ आहे.आता प्यायलोच आहोत तर आता अजून 2 पेग घेऊन नंतर थांबवू.?आज मनसोक्त पिऊ आणि उद्यापासून नाही हाच आजाराचा फसवा भाग आहे. ?एकदा आजाराच्या फसव्या विचारसरणीने आपल्याला घेरले की मग आपण स्वतःला थांबवू शकत नाही. मद्यपी पहिल्या घोटाला नाही म्हणू शकत नाही.?कुठलीही मानवी शक्ती आपल्याला पिण्यापासून थांबवू शकत नाही.?आपण असेच पित राहिलो तर आपण कायमचे वेडे होऊ,नाहीतर मृत्यूमूखी पडू. हीच आमची हतबलता आहे.?कित्येक मद्यपिना प्रामाणिकपणे मद्यपान थांबवायचे आहे पण त्यांना ते थांबवता येत नाही, हीच त्यांची समस्या आणि हतबलता आहे.?ए ए च्या लोकांच्या बाबतीत जो परमेश्वर तारक ठरला आहे तो जर नसता तर लक्षावधी लोकांना भीषण प्रसंगाना तोंड द्यावे लागले असते. ?याला उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे स्वतःचा आत्मसंशोधनाचा होय. ?तो अध्यात्मिक उपाय ए ए च्या 12 पायऱ्यात दिलेला आहे.?मद्यासक्ती नाहीशी करण्यासाठी आम्हांला आमच्या पूर्वीच्या विचारसरणीत संपूर्ण मानसिक बदल घडवून आणायचा आहे.?आम्हाला या 12 पायऱ्यांचे आचरण करून त्यावर कृती करायची आहे.?फेलोशिप किंवा मीटिंग हा उपाय नाही. ?ए ए चा कार्यक्रम हा मनाविरुद्ध वागायला लावणारा आहे पण जर तो आचरणात आणला तर आम्हाला सुखी, समाधानी जीवन जगता येणार आहे. ??????
Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago
आभार आभार आभार !!! ???????